Followers

Saturday, 29 May 2021

सावरकर

 सावरकरांचे बहुतांश भक्त, अनुयायी हे ढोंगी असतात. त्यांना फक्त बोटीतून उडी मारलेले, अंदमानात काही काळ शिक्षा भोगलेले आणि अस्मिता गोंजारणारे हिंदुत्ववादी वगैरे सावरकरच प्रिय असतात. नंतरच्या काळात त्यांनी मांडलेल्या सुधारणावादी विचारांची अमंलबजावणी करणारा मला त्यांचा एकही अनुयायी आजवर सापडला नाही. किंबहुना त्यांना ते विचार माहीतही नसतात.

सावरकरांनी लिहिलेल्या 'विज्ञाननिष्ठ निबंध' आणि 'क्षकिरणे' या दोन पुस्तकातील काही उदाहरणेच पहा...
👉 सुबुद्ध आणि दयाशील आणि प्रामाणिक माणसाच्या डोऴ्यांवर धर्माची झापड पडली, की त्याची बुद्धी भ्रंशते.
👉 गोरक्षण आणि गोभक्षण दोन्हीही का केले जाऊ नये? ब्रह्मवादाने या दोन्हीला स्वीकारले आहे. भक्षण आणि रक्षण हा भेदच ब्रह्मसृष्टीत नाही. 'नासतो विद्येत भावः नाभावो विद्यते सतः' ही ब्रह्मसृष्टी. मग गोभक्षण का करु नये?
👉 मायासृष्टीत जोवर मनुष्य आणि गाय-बैल हे पशू आहेत. तोवर मनुष्याने त्याच्याहून सर्व गुणांमधिये हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्याला पशूहून कमी मानण्यासारखे आहे आणि माणुसकीला कमीपणा आणण्यासारखे आहे,
👉 सजीव सृष्टीत गाय आणि गाढव ही समानच आहेत. एक वेळ थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धीहत्या होता कामा नये.
👉 गायत्री मंत्र म्हणून किंवा सूर्यपूजा करून उन्हाचे चटके निवारता येत नाहीत, त्यासाठी छत्री आणि पादत्राणेच योग्य. मग सूर्याला शिव्या देत चालले तरी हरकत नाही. जपापेक्षा जोड्यानेच शानिसुर्याची पिडा पुष्कळ कमी होते.
👉 देव ही कल्पना माणसाच्या बुद्धिहीनपणातून निर्माण होते.
👉 भारताला प्रगतीपथावर जायचं असेल तर श्रुतीस्मृतीपुराणं गुंडाळूनच ठेवली पाहिजेत आणि विज्ञानाची पानं उलटली पाहिजेत.
👉 धर्मग्रंथांवर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले. या विज्ञानयुगात समाजसंस्थेची जी संघटना करायची ती प्रत्यक्ष ऐहिक आणि विज्ञाननिष्ठ अशाच तत्वावर केली पाहिजे.
असे आणखी अनेक दाखले देता येतील. तूर्तास एवढे पुरे.
सावरकरांच्या हिंदुत्ववादी संघोट्या भाजपेई अंधअनुयायांनो, आहे हिम्मत सावरकरांचे हे विचार स्वीकारायची?
उलट सावरकरांच्या भक्तांपेक्षा आम्ही बरे. आम्ही त्यांच्या एकुण जीवन प्रवासातील जे चुकीचे त्याला चूकच म्हणतो आणि त्यांनी जे काही चांगले, सुधारणावादी विचार मांडले ते तर आम्ही अमलात आणीतच असतो. कारण आम्ही बिनडोक अंधभक्तांसारखे सावरकरांना देवत्व देऊन त्यांचे देव्हारे माजवत नाही तर त्यांना माणूसच समजतो आणि माणसाच्या हातून चुका होत असतात हे समजून घेतो. त्यामुळे घरादारात केवळ दिखाव्यासाठी सावरकरांचा फोटो लावून कंठाळी देशभक्तीचे उमाळे काढण्याचे ढोंग आम्हाला जमत नाही. म्हणून सावरकरांच्या चुकांवर अंधभक्तांसारखे पांघरूण घालण्याचे महापातकही आम्ही करत नाही. कारण इंग्रज सरकारच्या पायाशी दाती तृण धरून गयावया करणाऱ्या माफीला क्षमा नाही.
कुठे तो कम्युनिस्ट विचारसरणीचा भारतमातेचा धगधगता अंगार असलेला भगतसिंग आणि कुठे संकुचित हिंदुत्ववादी विचारसरणीचा विझलेला अंगार असलेले सावरकर! दोघेही क्रांतिकारी, पण एक सच्चा तर दुसरा लुच्चा!! एक निधड्या छातीने मरणाला सामोरा जाणारा तर दुसरा मरणाला घाबरून माफी मागणारा!!! 🎯JK
11